राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला सवाल, 'ती' खंत अखेर बोलून दाखवलीच

  211

नाशिक: राज ठाकरेंच्या भाषणांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. आज नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी ही खंत सवाल विचारत व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते तेथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.


दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंसमोर मांडलं. जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं झालेलं नुकसान, बॅंकेची वसुली, कांद्याचं भाव पाडणं याविषयावरही आपलं गाऱ्हाणं मांडत राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा, अशी मागणी केली.


यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा सवाल केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे.


राज ठाकरे पुढे म्हणाले, जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा रोखठोक शब्दांत सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल