लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ

लातूर : बदललेल्या वातावरणामुळे मानवासोबत आता प्राण्यांवरदेखील भयंकर दुष्परिणाम होत आहेत. राज्यात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावल्याची घटना गेल्यावर्षी समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरण केल्यामुळे काही प्रमाणात या आजारावर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र यावर्षी पुन्हा राज्यात लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात आतापर्यंत लम्पीमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पशुधनाला लम्पीच्या आजाराचा विळखा पडला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ७०२ जनावरांना लम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. पैकी, ६४ जनावरे दगावली तर ५६७ जनावरे लम्पीच्या आजारापासून बरी झाली आहेत. ब-या होणा-या जनावरांची संख्या जास्त असली तरी पशुपालकांसाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

आठ महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या. गावागावात लसीकरण करण्यात आले. यानंतर साथ आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्यानंतर काही ठिकाणी पुन्हा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. नवजात वासरांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ज्या पशूंचं लसीकरण झालं आहे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण दिसून येत नाही. मात्र ज्या पशूंचं लसीकरण झालं नाही अशी नवजात वासरं मृत्यमुखी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावात भेटी देखील दिल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील पशू हे औषध उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

जनावरांचं तात्काळ लसीकरण करून घेण्याची पशुसंवर्धन विभागाची सूचना
दरम्यान पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना घाबरून न जाता योग्य वेळी औषध उपचार करून घेऊन आपल्या पशुंचे रक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आणलेले पशू असतील किंवा नवजात वासरे असतील तर त्यांचं तात्काळ लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना विभागाने दिली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करावा, ते सहकार्यासाठी कायम उपलब्ध असतील असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)