लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ

लातूर : बदललेल्या वातावरणामुळे मानवासोबत आता प्राण्यांवरदेखील भयंकर दुष्परिणाम होत आहेत. राज्यात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावल्याची घटना गेल्यावर्षी समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरण केल्यामुळे काही प्रमाणात या आजारावर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र यावर्षी पुन्हा राज्यात लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात आतापर्यंत लम्पीमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पशुधनाला लम्पीच्या आजाराचा विळखा पडला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ७०२ जनावरांना लम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. पैकी, ६४ जनावरे दगावली तर ५६७ जनावरे लम्पीच्या आजारापासून बरी झाली आहेत. ब-या होणा-या जनावरांची संख्या जास्त असली तरी पशुपालकांसाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

आठ महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या. गावागावात लसीकरण करण्यात आले. यानंतर साथ आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्यानंतर काही ठिकाणी पुन्हा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. नवजात वासरांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ज्या पशूंचं लसीकरण झालं आहे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण दिसून येत नाही. मात्र ज्या पशूंचं लसीकरण झालं नाही अशी नवजात वासरं मृत्यमुखी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावात भेटी देखील दिल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील पशू हे औषध उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

जनावरांचं तात्काळ लसीकरण करून घेण्याची पशुसंवर्धन विभागाची सूचना
दरम्यान पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना घाबरून न जाता योग्य वेळी औषध उपचार करून घेऊन आपल्या पशुंचे रक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आणलेले पशू असतील किंवा नवजात वासरे असतील तर त्यांचं तात्काळ लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना विभागाने दिली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करावा, ते सहकार्यासाठी कायम उपलब्ध असतील असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह