दोन हजारांच्या ‘नोटबंदी’ची घोषणा अन् सोन्याची वाढली खरेदी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट चलनातून माघारी घेतली. त्यानंतर सोन्याची खरेदी वाढू लागली आहे. ज्यांच्यांकडे दोन हजारांच्या जास्त नोटा आहेत, ते सोने खरेदी करू लागले आहेत. तसेच चांदीची खरेदीही करीत आहेत.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला व बँकेने या नोटा चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँक आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेकडून यापूर्वीच २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. पण त्या चलनात कायम होत्या. आता या नोटबंदीचा फायदा प्रामुख्याने गुजरातसह अन्य ठिकाणचे सराफी व्यापारी घेत आहेत.



‘आरबीआय’ने २०००ची नोट चलनातून बाहेर घेतल्याचा निर्णय जाहीर करताच गुजरातमधील ज्वेलर्सने दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सोने घेणाऱ्यांसाठी किंमत वाढवून दिली आहे. दोन हजारांच्या नोटा देऊन सोने घेणाऱ्यांना १० ग्रॅमसाठी ७० हजार रुपये द्यावे लागणार आहे. राज्यात शनिवारी सोन्याचा दर मात्र दहा ग्रॅमसाठी ६० हजार २७५ रुपये होता. तसेच चांदीचे दरसुद्धा ८० हजार रुपये किलो करण्यात आले आहेत.



ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या जास्त नोटा आहेत, ते बँकेत जमा करण्यासाठी गेल्यावर त्यांची वार्षिक कमाई विचारली जाईल. त्यानुसार त्यांना कर द्यावा लागणार आहे. जास्त कॅश ठेवल्यानंतर सरकार विचारणाही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी केली जात आहे.

Comments
Add Comment

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील