काँग्रेसचा 'हा' नेता भाजपच्या वाटेवर; फडणवीसांनी घेतली भेट

सावनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. या दरम्यान फडणवीस यांनी काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलेल्या एका नेत्याच्या घरी भेट दिली. त्यामुळे या नेत्याला आता भाजपमधून उमेदवारी मिळणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सोबतच या नेत्याच्या हालचालींमुळे तो भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


'आशिष देशमुख' असं या नेत्याचं नाव असून त्यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


दरम्यान सावनेरमध्ये शुक्रवारी १९ मे ला कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं. उमेदवार ठरल्यावर वाद नको, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देशमुखांना सावनेरमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल.


सोबतच देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आशिष यांनी आपले वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मे ला सावनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. रणजीत हेच आधी सावनेरचे आमदार होते. सावनेरचे सद्यकालीन आमदार सुनील केदार यांनी १९९६ मध्ये त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता आशिष देशमुख पुन्हा या जागेवर डोळा ठेवून असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल.


Comments
Add Comment

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

LOAN WAIVER : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा!

MAHARASHTRA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'

Car Accident : धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडवलं, ५ गंभीर जखमी

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

Ashadhi Ekadashi Wari : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज

School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू