काँग्रेसचा 'हा' नेता भाजपच्या वाटेवर; फडणवीसांनी घेतली भेट

सावनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. या दरम्यान फडणवीस यांनी काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलेल्या एका नेत्याच्या घरी भेट दिली. त्यामुळे या नेत्याला आता भाजपमधून उमेदवारी मिळणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सोबतच या नेत्याच्या हालचालींमुळे तो भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


'आशिष देशमुख' असं या नेत्याचं नाव असून त्यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


दरम्यान सावनेरमध्ये शुक्रवारी १९ मे ला कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं. उमेदवार ठरल्यावर वाद नको, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देशमुखांना सावनेरमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल.


सोबतच देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आशिष यांनी आपले वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मे ला सावनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. रणजीत हेच आधी सावनेरचे आमदार होते. सावनेरचे सद्यकालीन आमदार सुनील केदार यांनी १९९६ मध्ये त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता आशिष देशमुख पुन्हा या जागेवर डोळा ठेवून असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र