नाशिक (प्रतिनिधी): रिझर्व्ह बँकेच्या दोन हजारांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर, असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या साईबाबांच्या शिर्डी संस्थानने सबुरीचl धोरण अवलंबलl आहे. ३० सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका असे आवाहन आतापासूनच शिर्डी संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात येत आहे. साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी हे आवाहन केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येतील. मागील नोटबंदीच्या काळातील नोटा अद्याप पडून असल्याने साई संस्थानने हा निर्णय घेतला असल्यांचे सांगितले जात आहे. शिर्डी संस्थानात दररोज लाखो रुपयांचे दान येत असते. भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानात दान करत असतात. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यानंतर शिर्डी संस्थानमध्ये या नोटा भाविकांनी दान केल्या होत्या. अनेक भक्तांनी दानपेटीत या नोटा टाकल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानच्या दानपेटीत या नोटा जमा झाल्या होत्या. नोटबंदीच्या काळात जवळपास ३ कोटी रुपयांच्या नोटा साईंच्या दानपेटीत जमा झाल्या होत्या. या नोटा आजही तशाच पडून आहेत. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे शिर्डी संस्थानकडून सांगितले जात आहे.
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. या नोटा नंतर कायदेशीर अवैध असणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच या गुलाबी नोटांनी केवळ साडे सहा वर्षांचा प्रवास केला असून आता या नोटा रद्द करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या नोटा चलनात होत्या. त्यावेळी त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु कोरोनाच्या काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा जम बसवत होती. परंतु त्यावेळेस दोन हजाराच्या नोटा मात्र गायब होऊ लागल्या होत्या. तसेच मागील तीन वर्षांपासून एकही दोन हजारांची नोट छापण्यात आलेली नाही. सर्वसामान्य लोकांना मात्र या नोटांचा बऱ्यापैकी त्रास व्हायचा, कारण ५०० नंतर थेट २००० च्या नोटा चलनात होत्या.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…