हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

वाशिम : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने वाशिम बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्‍यांनी बाजार समितीतच घोषणाबाजी सुरु केली आणि या घोषणाबाजीदरम्यान शेतकर्‍यांनी हळद खरेदी बंद पाडली.


वाशिम बाजार समितीत आठवड्यातून एकच दिवस शनिवारी हळद खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. मात्र या व्यवहारात हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अकोला - हैदराबाद रस्त्यावर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.


वास्तविक हळदीला ७,५०० ते ८,५०० रुपये इतका भाव मिळतो. मात्र खरेदीदार केवळ ४,५०० ते ६,५०० चा भाव लावत होते. त्यामुळे हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत आहेत, अशी शेतकर्‍यांची धारणा झाली. हळदीला योग्य भाव द्या अन्यथा हळद खरेदी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य