हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

वाशिम : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने वाशिम बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्‍यांनी बाजार समितीतच घोषणाबाजी सुरु केली आणि या घोषणाबाजीदरम्यान शेतकर्‍यांनी हळद खरेदी बंद पाडली.


वाशिम बाजार समितीत आठवड्यातून एकच दिवस शनिवारी हळद खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. मात्र या व्यवहारात हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अकोला - हैदराबाद रस्त्यावर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.


वास्तविक हळदीला ७,५०० ते ८,५०० रुपये इतका भाव मिळतो. मात्र खरेदीदार केवळ ४,५०० ते ६,५०० चा भाव लावत होते. त्यामुळे हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत आहेत, अशी शेतकर्‍यांची धारणा झाली. हळदीला योग्य भाव द्या अन्यथा हळद खरेदी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात