हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

वाशिम : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने वाशिम बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्‍यांनी बाजार समितीतच घोषणाबाजी सुरु केली आणि या घोषणाबाजीदरम्यान शेतकर्‍यांनी हळद खरेदी बंद पाडली.


वाशिम बाजार समितीत आठवड्यातून एकच दिवस शनिवारी हळद खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. मात्र या व्यवहारात हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अकोला - हैदराबाद रस्त्यावर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.


वास्तविक हळदीला ७,५०० ते ८,५०० रुपये इतका भाव मिळतो. मात्र खरेदीदार केवळ ४,५०० ते ६,५०० चा भाव लावत होते. त्यामुळे हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत आहेत, अशी शेतकर्‍यांची धारणा झाली. हळदीला योग्य भाव द्या अन्यथा हळद खरेदी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

IMD Weather Update : चिंता वाढली! मोथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण; पुढचे ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रासाठी IMDचा नवा इशारा!

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD - Indian Meteorological Department) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात