दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात सोडणार

नागपूर: वाघांची संख्या वाढवण्यासाठी ब्रह्मपुरी येथून आणलेल्या दोन वाघिणींना उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.


डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्लीचे अधिकारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व डॉक्टर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (NNTR) वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाचा खोळंबलेला संवर्धन ट्रान्स्लोकेशन प्रकल्प अखेर दोन वाघिणींना पकडल्यानंतर उद्या शनिवारी २० मे रोजी प्रत्यक्षात येणार आहे. त्यासाठी ब्रह्मपुरी येथून आणलेल्या २ वाघिणींना नागझिरा कोअर झोनमध्ये सुरक्षितपणे पोहचविण्यात आले आहे.


भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा हे अत्यंत घनदाट व आकर्षक जंगल आहे. मात्र हिंसक वाघांच्या स्थलांतरामुळे येथील पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. ९ वाघ व ३ वाघिणी अशी एकूण संख्या १२ आहे. नवेगाव नागझिरा अभयारण्यात समतोल राखण्यासाठी, वाघांचे हस्तांतरण करण्याचा प्रयोग राज्यात प्रथमच केला जात असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे.


नागझिरामध्ये एकूण ४ मादी वाघिणींना सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या २ वाघिणीना अजूनही पकडण्यात यश न आल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प वर्षभराहून अधिक काळ खोळंबला होता. परंतु आता ताडोबातील जलद बचाव पथकाने (RRT) दोन वाघिणींना पुन्हा सोडण्यासाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी १६ मे ला सकाळी गडचिरोलीतील आरमोरी रेंजमध्ये अडीच वर्षांच्या टी-४ वाघीणिला पकडण्यात आले. तिला बुधवारी सकाळी पावणेसात वाजता नवेगाव नागझिराच्या पिटेझरी गेट येथून नागझिरा येथे आणण्यात आले. १४ मे रोजी,ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा रेंजमधून हिरडी नाला वाघिणीच्या मोठ्या झालेल्या एका बछडीलाही पकडण्यात आले. उद्या या दोन्ही वाघिणीना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)