विरोधानंतरही ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ठरतोय सुपरहिट

मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्याआधी आणि रिलीजनंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. तर काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.


‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या नवव्या दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता रिलीजच्या १२ व्या दिवशी या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. तसेच २०२३ सालच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात या सिनेमाचा समावेश झाला आहे.


आजही या चित्रपटाला चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे उच्चांक गाठत असल्याचे दिसत आहे. ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्या १२ व्या दिवशी ९.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत रिलीजच्या १२ दिवसांत या चित्रपटाने १५६.८४ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तसेच ‘द केरला स्टोरी’ १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होत आहे.


यामुळे आता येत्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट २०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकणार आहे, अशी निर्मात्यांना मोठी आशा आहे. २०२३ मधील ‘द केरला स्टोरी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरणार आहे.


‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी हे मुख्य भूमिकेत आहेत. ४० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन यांनी सांभाळली आहे.

Comments
Add Comment

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतने गायलं मराठी सिनेमासाठी गाणं, नवीन गाण्यातून वेगळीच झलक प्रेक्षकांसमोर

मुंबई: इंडियन आयडियल १ चा विजेता, बिग बॉस मराठी ५ चा रनर अप आणि लाखो मुलींची धडकन अभिजीत सावंत. हिंदीत मोहबते

सोशल मीडिया स्टार अरुण तुपे याचे अकाली निधन; काय आहे मृत्यूचे कारण...

मुंबई : विनोद शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारा शिवाय उत्कृष्ट कन्टेन्टने प्रेक्षकानं भारावून सोडणारा छत्रपती

अखेर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा घरी परतला; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.