विक्रांत आचरेकर फाऊंडेशनच्या आंबा महोत्सवाची सांगता

मुंबई ( प्रतिनिधी) : विक्रांत आचरेकर फाऊंडेशनच्या वतीने दि. १२, १३ आणि १४ मे दरम्यान दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवा’चा सांगता समारंभ मुंबईकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी माजी खासदार निलेश राणे, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व आमदार सदा सरवणकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन केले.



शेवटच्या दिवशी उखाणे क्वीन, मँगो क्वीन, किचन क्वीन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभंग रिपोस्ट बॅन्डने उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रसिद्ध शेफ वरुण इनामदार यांच्यासहीत टीव्ही मालिकेतील अनेक कलाकारांनीही उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आंबा व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचे फळ रास्त दरात उपलब्ध करून देणे, हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट होते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्याचा हा प्रयत्न होता. आंब्यासोबतच आंब्यापासून बनलेल्या पदार्थांची चवही या महोत्सवांदरम्यात ग्राहकांना चाखता आली. आंबा आणि आंब्यापासून बनलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स हे आंबा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या दर्जेदार खाद्य पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी येथील फूड स्टॉल्सवर घेतला. याशिवाय कोकणातील भव्यदिव्य देखावे आणि त्या सभोवताली बनवलेले सेल्फी कॉर्नर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.



भव्य आंब्याची पेटी ज्यामध्ये उभे राहून फोटो काढता येतो, शिवाय कोकण किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठेवलेली नाव, आंब्याच्या मोठ्या प्रतिकृती लहान-थोरांसाठी उत्तम फोटो काढायची संधी
मुंबईकरांना मिळाली.



यावेळी उत्तमोत्तम नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठी रॅप कलाकारांनी रॅपच्या अंदाजात पारंपरिक मराठी गीतांची उत्तम सांगड घातली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके जिंकत आंबा आणि आंब्याच्या उत्पादनांचा आस्वाद विक्रांत आचरेकर प्रस्तुत आंबा महोत्सवामध्ये मुंबईकरांनी घेतला.

Comments
Add Comment

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या