‘जी-२०’मध्ये सागरी किनारा मार्गावर होणार चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि त्यांना प्रदूषणमुक्त प्रवास करता यावा यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या कामाने चांगलाच वेग धरला आहे. एकूण साडेदहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर किमान साडेआठ किलोमीटर लांबीच्या सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतीमुळेच सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईला भेडसावणारा पुराचा धोका टळणार आहे, असा दावा महापालिकेने केला. मुंबईत येत्या २३ ते २५ मे या कालावधीत होणाऱ्या ‘जी-२०’च्या आपत्ती जोखीम निवारण बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पांतर्गत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.


सागरी किनारा मार्ग हा मरिन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी सुमारे १३.६० टक्के क्षेत्रफळ म्हणजे १५ लाख ६० हजार ७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) सागरी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वांद्रे-वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्गाची जोड देताना या मार्गावर प्रियदर्शनी पार्कपासून ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीची अभेद्य अशा सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जात आहे.



सध्या सात ते सव्वासात किलोमीटरपर्यंत या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. ही भिंत साधारण सहा ते नऊ मीटर उंच आहे. भिंत बांधण्यासाठी ‘आर्मर रॉक’ म्हणजेच बसाल्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. असे एक ते चार टनांच्या या दगडांचे दोन थर रचण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांपासून सागरी किनाऱ्याचा बचाव होण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय पुराचे पाणीही आत येऊ शकणार नाही.ही भिंत बांधताना पुराची सर्वोच्च पातळीही लक्षात घेण्यात आली आहे.


प्रदूषणमुक्त प्रवास
मुंबई सागरी किनारा मार्गामुळे वाहनांचा वेग वाढेल, इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनामध्येही घट होईल. मरिन ड्राईव्ह ते वरळी या दरम्यानच्या प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत होणार आहे. या पट्ट्यात पर्यावरणाचे संरक्षण आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी उद्याने असतील.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका