कोंडिवडे पूल झालाय धोकादायक; नवीन पूल बांधण्याची गरज

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोंडिवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाची सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची गरज असून, त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे.



तालुक्यातील चिंचवली-उकरूळ-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर कोंडिवडे गावाच्या अलीकडे ३० फूट उंचीचा लहान पूल आहे. हा पूल अनेक वर्षे शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च केला जात आहे. खांडपे आणि कोंदिवडे गावाच्या मध्ये हा पूल आहे. २५ फूट लांबीचा हा पूल बांधून ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, पुलाची बांधणी केल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग या पुलाची दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे पूल धोकादायक बनला असून या पुलाच्या कठड्याला एखादे वाहन जरी धडकले तरी ते वाहन खाली कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. हा पूल अपघातग्रस्त होऊन बंद पडल्यास वाहतुकीसाठी कोंदिवडे, चोची, कोंढाणे तसेच मुंढेवाडी या गावांमधील वाहनचालकांना अडचणी निर्माण होणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी चाचपणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या