उद्धव ठाकरेंच्या स्पेशल खूर्चीचा प्रवास आता स्टुलाकडे!

भाजप आमदार नितेश राणे यांचा चौफेर हल्ला


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या वागणुकीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी चौफेर हल्ला केला. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची अवस्था ही दरबारातल्या सरदारांसारखी झाली. महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे मुख्य खुर्चीवर बसले होते. कालच्या बैठकीत त्यांना बसायला जागा नव्हती. ते सोफ्यावर बसले होते. आता ठाकरेंना स्टुलावर बसवतील का ही भीती आहे, अशी जहरी टीका राणेंनी केली.


राणे पत्रकार परिषद घेत म्हणाले, काल सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीचे फोटो व्हायरल झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वजन होते. त्यांचा वेगळाच रुबाब होता. पूर्वी मातोश्रीवर अनेक नेत्यांची रिघ लागायची. मोठमोठे नेते, कलाकार मातोश्रीवर यायचे. पण उद्धव ठाकरेंना काल सिल्व्हर ओकवर जी वागणूक मिळाली, त्यावर त्यांनी विचार करावा. उद्धव ठाकरे भाजपसोबत असताना त्यांना जो, आदर होता. तो काल दिसला नाही, असे राणेंनी म्हटले.



आज महाविकास आघाडीमध्ये उद्धवजींची काय अवस्था झाली. मविआमध्ये ठाकरेंचा रुबाब कमी झाला. आज परिस्थिती खूप बदलली. ठाकरेंना नीट बसायलाही जागा नव्हती. उद्धव ठाकरेंची गत मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली. संजय राऊत सारख्या लोकांच्या नादी लागल्यानं तुमची अवस्था काय झाली. आता सोफ्यावरून तुम्ही स्टुलवर याला अशी भीती वाटते आहे. उद्धव ठाकरेंकडे नेता उरला नाही, आहे तो फक्त कामगार. ही उद्धव सेनेची अवस्था आहे, असे नितेश राणे म्हणाले.


कर्नाटक निवडणुकीवर भाष्य करून राऊतांना काँग्रेसचा मान गमावला आहे. हा एकट्या काँग्रेसचा विजय नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. नाना पटोले यांना हा अपमान मान्य आहे का? संजय राऊत महाविकास आघाडीत शकुनीमामा आणि नारदमुनी आहेत, महाविकास आघाडीत संजय राऊत नारद मुनीचा रोल करतो, अशी टीका राणेंनी केली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने