उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या 'या' तीन मागण्या

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांना तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ती मागणी होती. या मागणीत प्रस्तावित तीन महामार्गांना देवेंद्र फडणवीस यांनी महान व्यक्तिमत्त्वांची नावे सुचवली होती.


मुंबईची लाईफलाईन ठरणा-या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. तशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल १४ मे ला गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.





याच पत्रात फडणवीसांनी आणखी दोन मागण्या केल्या होत्या. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. या दोन मागण्या पूर्ण होणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.


 

 

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या