उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या 'या' तीन मागण्या

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांना तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ती मागणी होती. या मागणीत प्रस्तावित तीन महामार्गांना देवेंद्र फडणवीस यांनी महान व्यक्तिमत्त्वांची नावे सुचवली होती.


मुंबईची लाईफलाईन ठरणा-या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. तशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल १४ मे ला गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.





याच पत्रात फडणवीसांनी आणखी दोन मागण्या केल्या होत्या. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. या दोन मागण्या पूर्ण होणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.


 

 

Comments
Add Comment

घाटकोपरमध्ये भरदिवसा दरोडा : सराफाच्या दुकानावर चाकूने हल्ला करून सोन्याची लूट, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : घाटकोपरमधील अमृत नगर परिसरात आज सकाळी (१५ ऑक्टोबर) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून

पर्यावरणाची काळजी घेत आणि सुरक्षिततेचे नियम पाळत कशी कराल साजरी दीपावली

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा.

Shivsena vs Sadavatre : ब्रेकिंग! एसटी बँकेत भर बैठकीत राडा, बाटल्या फेकल्या; सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC)

महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६

सोशल मीडियातील चूक 'येवले अमृततुल्य'ला भोवणार ?

मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर