उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या 'या' तीन मागण्या

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांना तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ती मागणी होती. या मागणीत प्रस्तावित तीन महामार्गांना देवेंद्र फडणवीस यांनी महान व्यक्तिमत्त्वांची नावे सुचवली होती.


मुंबईची लाईफलाईन ठरणा-या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. तशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल १४ मे ला गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.





याच पत्रात फडणवीसांनी आणखी दोन मागण्या केल्या होत्या. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. या दोन मागण्या पूर्ण होणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.


 

 

Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या