उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या 'या' तीन मागण्या

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांना तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ती मागणी होती. या मागणीत प्रस्तावित तीन महामार्गांना देवेंद्र फडणवीस यांनी महान व्यक्तिमत्त्वांची नावे सुचवली होती.


मुंबईची लाईफलाईन ठरणा-या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. तशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल १४ मे ला गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.





याच पत्रात फडणवीसांनी आणखी दोन मागण्या केल्या होत्या. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. या दोन मागण्या पूर्ण होणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.


 

 

Comments
Add Comment

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली

पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका लागली कामाला

दोन महिन्यांत २ हजार कोटींचे आहे लक्ष्य मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष