उष्माघाताने राज्यात चार जणांचा बळी

नाशिक: राज्यातील उन्हाचा कडाका अधिक कडक होत असून उष्माघाताने शनिवारी चार जणांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. उष्माघाताने नाशिक जिल्ह्यात दोन तर छत्रपती संभाजीनगरात एक आणि नांदेड जिल्ह्यात एक बळी गेला आहे.


नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शनिवारी नाशिक तालुक्यातील राहुरी येथे एका शेतकऱ्याचा तर मालेगाव जवळ एका ट्रक चालकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. साहेबराव शांताराम आव्हाड असे राहुरी येथील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून अकोला येथील अकबर शहा मेहबूब मेहबूब शहा, नांदेड येथील विशाल रामदास मादसवार आणि पैठण तालुक्यातील तातेराव मदन वाघ असे मृत झालेल्या नागरिकांची नावे आहेत.


नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भर दुपारी शेतात काम करताना आव्हाड यांना अचानक चक्कर आली. गोरखनाथ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी देवळाली कंटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष होनराव यांनी साहेबराव यांना तपासून मयत घोषित केले. रखरखत्या उन्हात शेतात काम केल्याने उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


दुसऱ्या घटनेत मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणारा अकबर शहा मेहबूब शहा हा ट्रक चालक मालेगाव हॉटेल संयोगजवळ जेवणासाठी थांबला होता. यावेळी त्याला अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी क्लीनरला याबाबत माहिती दिली. क्लीनरने हॉटेल मालकाला या संदर्भात सांगितलं असता त्यांनी चाळीसगाव फाट्यावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावली. रुग्णवाहिका चालक राहुल पाटील यांनी अकबर शहाला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तपासणी आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान चिकित्सेनंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या