उष्माघाताने राज्यात चार जणांचा बळी

  171

नाशिक: राज्यातील उन्हाचा कडाका अधिक कडक होत असून उष्माघाताने शनिवारी चार जणांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. उष्माघाताने नाशिक जिल्ह्यात दोन तर छत्रपती संभाजीनगरात एक आणि नांदेड जिल्ह्यात एक बळी गेला आहे.


नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शनिवारी नाशिक तालुक्यातील राहुरी येथे एका शेतकऱ्याचा तर मालेगाव जवळ एका ट्रक चालकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. साहेबराव शांताराम आव्हाड असे राहुरी येथील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून अकोला येथील अकबर शहा मेहबूब मेहबूब शहा, नांदेड येथील विशाल रामदास मादसवार आणि पैठण तालुक्यातील तातेराव मदन वाघ असे मृत झालेल्या नागरिकांची नावे आहेत.


नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भर दुपारी शेतात काम करताना आव्हाड यांना अचानक चक्कर आली. गोरखनाथ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी देवळाली कंटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष होनराव यांनी साहेबराव यांना तपासून मयत घोषित केले. रखरखत्या उन्हात शेतात काम केल्याने उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


दुसऱ्या घटनेत मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणारा अकबर शहा मेहबूब शहा हा ट्रक चालक मालेगाव हॉटेल संयोगजवळ जेवणासाठी थांबला होता. यावेळी त्याला अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी क्लीनरला याबाबत माहिती दिली. क्लीनरने हॉटेल मालकाला या संदर्भात सांगितलं असता त्यांनी चाळीसगाव फाट्यावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावली. रुग्णवाहिका चालक राहुल पाटील यांनी अकबर शहाला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तपासणी आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान चिकित्सेनंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील