मुंबई : आय.एल.एफ.एस प्रकरणी ईडीने काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लग्नाच्या वाढदिवशीच चौकशीसाठी नोटीस पाठवली. ही चौकशी आज होणार होती. मात्र घरात लगीनसराई असल्याने जयंत पाटील यांनी १० दिवसांची मुदतवाढ मागणारे पत्र ईडीला पाठवले.
“ईडी चौकशीसाठी आलेल्या नोटीसमध्ये काही कारण दिलेलं नव्हतं. पण फाईल्स काढून पाहिल्या असता त्यात आय.एल.एफ.एस नावाची कुठली तरी संस्था होती. जिच्याशी माझा आयुष्यात कधीच संबंध आला नाही किंवा मी या संस्थेकडून कर्ज घेतलेलं नाही. तरीही ही नोटीस आली त्यामुळे जी काही चौकशी असेल त्याला सामोरे जाऊ मात्र घरात जवळच्यांची लग्नं असल्याने ईडीकडे वेळ मागणारं पत्र मी पाठवत आहे”, असं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आय.एल.एफ.एसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं होतं, मात्र त्यांनी मुदतवाढीसाठी ईडीला पत्र पाठवलं आहे.
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…