कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे : राज ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया


मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे, असं ते यावेळी म्हणाले.


"कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. आपण कुठच्या पदावर बसलेलो आहोत हे प्रत्येकाला समजलं पाहिजे", असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना जपून राहण्याचा सल्ला दिला.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विधीमंडळातल्या गटाला पक्ष म्हणून मान्यता नसून बाहेरच्या गटाला आहे. मग आता निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह ज्या गटाकडे दिलं गेलंय त्याचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर