सगळ्यामध्ये तोंड घुसवायची संजय राऊतांची सवय : नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन काही मते मांडली. संजय राऊतांना सगळ्यामध्ये तोंड खुपसायची सवय आहे,असा दावा त्यांनी यावेळी केला. तसंच देशात लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणार्‍या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या गैरवर्तुणुकीची उदाहरणे देऊन चपराक दिली.


"संजय राऊत सातत्याने कायद्याचा गाढा अभ्यास असणार्‍या राहुल नार्वेकरांवर टीका करतात, जणू काही हे स्वतःच फार मोठे घटनातज्ज्ञ किंवा मुन्नाभाई एल.एल.बी आहेत. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की ज्या राहुल नार्वेकरांवर तुम्ही टीका करतायत त्यांच्याकडेच तुमच्या मालकाचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे कायदा शिकायला जात होते. म्हणजेच आदित्य ठाकरेलाहु कायद्याचं काही कळत नाही", असं नितेश राणे म्हणाले.


आजच्या निकालावरुन देशात लोकशाही आहे की नाही हे कळेल, असं टेपरेकाॅर्डर संजय राऊत यांनी लावलं आहे. म्हणजे यांच्याविरुद्ध लागला तस लगेच लोकशाही खतरे में है, असं हे म्हणतील. पण ज्या देशात तुम्ही लोकशाहीचा सवाल उपस्थित करताय तिथे लोकशाही नसती तर आदित्य ठाकरे कोविडच्या वेळी जग घरात बसलेलं तेव्हा हाॅटेलमध्ये दारु पित बसले नसते. कर्नाटकात प्रचार करणार्‍या माननीय पंतप्रधान मोदींनी देश सांभाळला पाहिजे, हे राऊतांनी उद्धव ठाकरेंना ते मुख्यमंत्री असताना समजवायला पाहिजे होतं. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य शिवसेनेच्या प्रचारासाठी गेले असताना डब्ल्यू हाॅटेलच्या रुममध्ये काय करत होते?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे.


सामनाच्या अग्रलेखामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलण्याची तुमची लायकी नसल्याचं नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले. 'कोर्टाचा आजचा निकाल हा संविधानानुसारच होईल, उगाच संजय राऊतांनी दुसर्‍यांना धडे देऊ नये' असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत