सगळ्यामध्ये तोंड घुसवायची संजय राऊतांची सवय : नितेश राणे

  237

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन काही मते मांडली. संजय राऊतांना सगळ्यामध्ये तोंड खुपसायची सवय आहे,असा दावा त्यांनी यावेळी केला. तसंच देशात लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणार्‍या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या गैरवर्तुणुकीची उदाहरणे देऊन चपराक दिली.


"संजय राऊत सातत्याने कायद्याचा गाढा अभ्यास असणार्‍या राहुल नार्वेकरांवर टीका करतात, जणू काही हे स्वतःच फार मोठे घटनातज्ज्ञ किंवा मुन्नाभाई एल.एल.बी आहेत. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की ज्या राहुल नार्वेकरांवर तुम्ही टीका करतायत त्यांच्याकडेच तुमच्या मालकाचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे कायदा शिकायला जात होते. म्हणजेच आदित्य ठाकरेलाहु कायद्याचं काही कळत नाही", असं नितेश राणे म्हणाले.


आजच्या निकालावरुन देशात लोकशाही आहे की नाही हे कळेल, असं टेपरेकाॅर्डर संजय राऊत यांनी लावलं आहे. म्हणजे यांच्याविरुद्ध लागला तस लगेच लोकशाही खतरे में है, असं हे म्हणतील. पण ज्या देशात तुम्ही लोकशाहीचा सवाल उपस्थित करताय तिथे लोकशाही नसती तर आदित्य ठाकरे कोविडच्या वेळी जग घरात बसलेलं तेव्हा हाॅटेलमध्ये दारु पित बसले नसते. कर्नाटकात प्रचार करणार्‍या माननीय पंतप्रधान मोदींनी देश सांभाळला पाहिजे, हे राऊतांनी उद्धव ठाकरेंना ते मुख्यमंत्री असताना समजवायला पाहिजे होतं. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य शिवसेनेच्या प्रचारासाठी गेले असताना डब्ल्यू हाॅटेलच्या रुममध्ये काय करत होते?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे.


सामनाच्या अग्रलेखामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलण्याची तुमची लायकी नसल्याचं नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले. 'कोर्टाचा आजचा निकाल हा संविधानानुसारच होईल, उगाच संजय राऊतांनी दुसर्‍यांना धडे देऊ नये' असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.