विजयासाठी घमासान

कोलकाता (वृत्तसंस्था) :
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील गटातील सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे प्लेऑफ प्रवेशाची रेस आता तीव्र झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ गुरुवारी एकमेकांना भिडणार आहेत. ही लढत म्हणजे एक प्रकारे आभासी नॉकआऊट असल्याचे दिसते. पराभूत संघाच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आशा जवळपास संपुष्टात येतील. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीवतोड खेळतील.



यंदाच्या हंगामाची खराब सुरुवात करणाऱ्या कोलकाताने आठव्या सामन्यापासून टॉप गिअर टाकला. या चार सामन्यांपैकी ३ सामने जिंकत त्यांनी प्लेऑफ प्रवेशाचा दरवाजा बंद होऊ दिला नाही, तर दुसरीकडे दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानने पराभवाची हॅटट्रिक केल्याने अंतिम चार संघांमधील त्यांचा प्रवेश अवघड झाला आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ करो या मरो स्थितीत आहेत.



केकेआरचा संघ गोलंदाजीत फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर अवलंबून असेल. त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुभवी गोलंदाज सुनील नरेन विकेटसाठी झगडत असताना चक्रवर्ती संघासाठी हुकुमाचा एक्का ठरत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामन्याकरिता भारतीय संघात स्थान मिळालेल्या शार्दुल ठाकूरला पंजाबविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या सामन्यात कोलकाताची वेगवान गोलंदाजी कमजोर झाली. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शार्दुलला गोलंदाजी करण्याची संधी मिळते का? ते गुरुवारीच कळेल. राजस्थान रॉयल्सचे यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन ही तिकडी शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या तिघांना रोखण्याचे केकेआरच्या गोलंदाजांसमोर आव्हान आहे. राजस्थानलाही आपल्या वेगवान गोलंदाजी विभागाबाबत चिंता आहे. त्यामुळे त्यांना योग्य रणनिती आखून मैदानात उतरावे लागणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत