एक्झिट पोलचे आकडे : कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील मतदान आज संपले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकूण जागा २२४ असून बहुमतासाठी ११३ आकड्यांचा मॅजिक फिगर आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार असून त्याला १०० ते ११२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहणार असून त्याला ८३ ते ९५ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. तर जेडीएसला २१ ते २९ जागा मिळण्याची शक्यता आहे.



एबीपी न्यूज सी व्होटरच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. पण काँग्रेस बहुमताच्या जवळ जाऊ शकते. काँग्रेसला १०० ते ११२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहणार असून भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे.


जेडीएसला किती जागा मिळणार?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, धर्मनिरपक्ष जनता दल म्हणजे जेडीएसला २१ ते २९ जागा मिळण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर कुमारस्वामी पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. २०१७ साली अशीच परिस्थिती असताना कुमारस्वामींनी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच