कोलकाता पंजाबवर भारी

कोलकाता (वृत्तसंस्था) : वरुण चक्रवर्तीची दमदार गोलंदाजी आणि नितीश राणा, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी त्याला मिळालेली रिंकू सिंहची निर्णायक खेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकातासाठी यशस्वी ठरली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला.



पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सला बरी सुरुवात मिळाली. सांघिक फलंदाजी करत कोलकाताने विजय सोपा केला. त्यात कर्णधार नितीश राणाने ५१ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलची बॅट चांगलीच तळपली. त्याला रिंकू सिंहने छान साथ दिली. त्यामुळे कोलकाताने फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला झुंजवले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. थरारक अशा या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने ४२ धावा फटकवल्या. रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी निर्णायक अशी होती. पंजाबचा अर्शदीप सिंग महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याने शेवटचे निर्णायक असे षटक अप्रतिम टाकले. राहुल चहरने पंजाबकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट मिळवल्या.



नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली. धवनने पंजाबच्या डावाला आकार दिला. त्याने ४७ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत धवनने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नितीश राणाने धवनची खेळी संपुष्टात आणली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरच्या षटकांत दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने एक षटक टाकले पण तो महागडा ठरला. त्याला एका षटाकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या फलंदाजांनी रसेलच्या एका षटकात ४ चौकार लगावले.

Comments
Add Comment

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

टेनिसपटू रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो पहिल्यांदाच

ICC Women's World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? पराभूत संघावरही होणार 'कोट्यवधींचा वर्षाव'! आकडेवारी पहाच...

नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

ICC Womens World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तुफान झुंज; फायनल कधी, कुठे, किती वाजता? 'या' ॲपवर मोफत पाहा!

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऐतिहासिक