कोलकाता पंजाबवर भारी

कोलकाता (वृत्तसंस्था) : वरुण चक्रवर्तीची दमदार गोलंदाजी आणि नितीश राणा, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी त्याला मिळालेली रिंकू सिंहची निर्णायक खेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकातासाठी यशस्वी ठरली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला.



पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सला बरी सुरुवात मिळाली. सांघिक फलंदाजी करत कोलकाताने विजय सोपा केला. त्यात कर्णधार नितीश राणाने ५१ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलची बॅट चांगलीच तळपली. त्याला रिंकू सिंहने छान साथ दिली. त्यामुळे कोलकाताने फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला झुंजवले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. थरारक अशा या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने ४२ धावा फटकवल्या. रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी निर्णायक अशी होती. पंजाबचा अर्शदीप सिंग महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याने शेवटचे निर्णायक असे षटक अप्रतिम टाकले. राहुल चहरने पंजाबकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट मिळवल्या.



नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली. धवनने पंजाबच्या डावाला आकार दिला. त्याने ४७ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत धवनने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नितीश राणाने धवनची खेळी संपुष्टात आणली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरच्या षटकांत दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने एक षटक टाकले पण तो महागडा ठरला. त्याला एका षटाकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या फलंदाजांनी रसेलच्या एका षटकात ४ चौकार लगावले.

Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय