मुंबईत ‘एमयूटीपी ३’च्या प्रकल्पांना येणार वेग

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने सुरू असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा तीनच्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मार्च २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.



दरम्यान नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.



मुंबईकरांचा प्रवास सुखकर, वेगवान होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आढावा बैठकीत ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, या ‘एमयूटीपी ३ अ’ प्रकल्पासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर एमएमआरडीएकडून १०० कोटी रुपये मिळाल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन