मुंबईत ‘एमयूटीपी ३’च्या प्रकल्पांना येणार वेग

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने सुरू असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा तीनच्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मार्च २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.



दरम्यान नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.



मुंबईकरांचा प्रवास सुखकर, वेगवान होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आढावा बैठकीत ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, या ‘एमयूटीपी ३ अ’ प्रकल्पासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर एमएमआरडीएकडून १०० कोटी रुपये मिळाल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत