शरद पवार निपाणीला रवाना

निपाणी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज निपाणीकडे रवाना झाले आहेत. हेलिकाॅप्टरने ते कागलमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच ते निपाणीला पोहोचतील.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहायचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आज निपाणीला सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ९ उमेदवार उभे केले आहेत. त्यांपैकी एक निपाणी मतदारसंघ आहे. या निपाणी मतदारसंघाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आज दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या पुढच्या दौर्‍यासाठी रवाना होतील.

काल म्हणजेच ७ मे ला देवेंद्र फडणवीस यांनी निपाणी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारासाठी याच ठिकाणी सभा घेतली होती. निपाणीला ज्या ठिकाणी फडणवीसांची सभा झाली तिथेच शरद पवार आज सभा घेणार आहेत. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आणि शरद पवारांची सभा आता पुन्हा जुळून येईल की काय अशी चर्चा केली जात आहे.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शरद पवार सभेतून राष्ट्रवादीला मतं देण्यासाठी नक्की काय आवाहन करणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
Comments
Add Comment

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या