शरद पवार निपाणीला रवाना

  134

निपाणी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज निपाणीकडे रवाना झाले आहेत. हेलिकाॅप्टरने ते कागलमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच ते निपाणीला पोहोचतील.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहायचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आज निपाणीला सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ९ उमेदवार उभे केले आहेत. त्यांपैकी एक निपाणी मतदारसंघ आहे. या निपाणी मतदारसंघाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आज दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या पुढच्या दौर्‍यासाठी रवाना होतील.

काल म्हणजेच ७ मे ला देवेंद्र फडणवीस यांनी निपाणी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारासाठी याच ठिकाणी सभा घेतली होती. निपाणीला ज्या ठिकाणी फडणवीसांची सभा झाली तिथेच शरद पवार आज सभा घेणार आहेत. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आणि शरद पवारांची सभा आता पुन्हा जुळून येईल की काय अशी चर्चा केली जात आहे.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शरद पवार सभेतून राष्ट्रवादीला मतं देण्यासाठी नक्की काय आवाहन करणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
Comments
Add Comment

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :