मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी कोलकाताचे नागरिक मोजत आहेत तब्बल २५ हजार रुपये

  218

इंफाळ : गेले काही दिवस मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक लोक तिथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत. यामुळे इंफाळ ते कोलकाता खाजगी विमानांचे भाडे २५,००० रुपयापर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतीपेक्षा ८ पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास २५०० ते ३००० रुपये आहे.


इथून तात्काळ बाहेर पडण्यासाठी हजारो लोक आपल्या विमानाची वाट पाहत होते. बरेच लोक विमानाची वाट पाहत जमिनीवर बसलेले किंवा झोपलेले आहेत. शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टॅंड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते.


इंफाळ - कोलकातादरम्यान उड्डाण करणार्‍या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे. मात्र ट्रॅव्हल एजंटच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटाची मागणी लक्षणीय वाढली आहे.



दरम्यान, शहरातील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही शहरात कुठेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती, परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने