लष्काराचे मिग 21 कोसळून अपघात, ४ ठार एक जखमी

जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे लष्कराचं मिग 21 हे विमान कोसळ्यानं झालेल्या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतल्याने तो बचावला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.


विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका घरावर हे विमान कोसळलं. तेव्हा घराच्या बाहेर मुलं खेळत होती.


या फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या अपघातात एका महिलेला जीव गमवाला लागला. ही महिला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे