जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे लष्कराचं मिग 21 हे विमान कोसळ्यानं झालेल्या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतल्याने तो बचावला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका घरावर हे विमान कोसळलं. तेव्हा घराच्या बाहेर मुलं खेळत होती.
या फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या अपघातात एका महिलेला जीव गमवाला लागला. ही महिला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
जय शहा यांची माहिती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या…
कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…
पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…
मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…
पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…