ठाण्यात चार महिन्यांत ३७६ आगींच्या घटना

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यामध्ये चार महिन्यांत तब्बल ३७६ आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये प्रामुख्याने शॉर्ट सर्किट होऊन याचे रूपांतर मोठ्या आगीच्या घटनांमध्ये झाले असल्याचे समोर आले आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत असून व्यावसायिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घरातील केबल तसेच उपकरणांची तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



कापूरबावडी येथील बिजनेस पार्कला लागलेली आग, मानपाडा येथील प्लायवूडच्या दुकानाला तसेच उपवन येथील सूर संगीत या बारला लागलेली आग काही जवळची उदाहरणे असून मे महिन्यातील सहा दिवसांमध्ये १२ आगीच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा वापराचा वाढला असून त्याचा ताण घर व कार्यालयातील वीज पुरवठा करीत असलेल्या वायरींगवरदेखील दिसून येतो. वायरींग जुनी झालेली असेल, एसीचा लोड सहन करण्याची क्षमता नसेल तर, अशी जुनी वायर जास्त भाराने तुटून शॉर्ट सर्किट होण्याची देखील जास्त शक्यता असते.



१५०० वॅट क्षमतेचा एसी प्रति दिन किमान ६ तास जरी चालवला तरी, महिन्याला जवळपास २७० युनिट विजेचा वापर होतो. घरी एअर कुलर असेल आणि तो दिवसातून किमान ८ तास चालवला तर, महिन्याला जवळपास ४२ युनिटची भर बिलात होऊ शकते. ज्यांच्या घरी गिझर आहे, त्यांचेदेखील महिन्याला अंदाजे १०० युनिट वाढू शकतात.



ठाणे शहरावरील ताण मागील काही वर्षांत वाढलेला आहे. त्यामुळे नवनवीन मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब ठाण्यात उभी राहत आहेत. त्यातून विजेचा वापरही वाढला आहे. त्यात मार्चपासूनच ठाण्याचे तापमान ४२ अंशांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यातदेखील पारा वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढून एसी, पंखे व इतर विजेची उपकरणे सलग सुरु राहत आहेत. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कापुरबावडी येथे बिझनेस पार्कला लागलेली आग देखील शॉकसर्किटमुळे लागल्याचे दिसून आले. त्यानंतर मानपाडा येथे फर्निचर दुकानातदेखील अशाच पद्धतीने आग लागल्याचे दिसून आले. उपवन येथे हॉटेलला देखील आग लागली होती.



दरम्यान, आग लागण्याच्या प्रमुख कारणांमध्ये वातानुकूलित यंत्रणा वेळच्या वेळी सर्व्हीसींग न करणे, वीजेची उपकरणांची तपासणी योग्य वेळेत न करणे आदी कारनांमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्यावेळी सर्व्हींसीग आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे. घरातील पंखे व एसीचा वापरही वाढला आहे. परंतु त्यांच्या सर्व्हींसीगकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.


ठाणे महापालिका हद्दीत लागलेल्या आगींचा तपशील :- 
जानेवारी - ६७


फेब्रुवारी - ११५


मार्च - ९५


एप्रिल - ८७


मे (५ मेपर्यंत) - १२


एकूण - ३७६

Comments
Add Comment

Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) : अनधिकृत होर्डिंग्जमुळे KDMC ला मोठं नुकसान; भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा गंभीर आरोप

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) अनधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारामुळे

Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार मुंबई : संपूर्ण

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.