जम्मूमध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवादी ठार

  158

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली असून जम्मूमध्ये रोज चकमकी घडत आहेत. शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते, तर शनिवारी सकाळी जम्मू पोलिसांनी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले आहे. २१ एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांना शोधण्याकरता जम्मू पोलीस आणि भारतीय लष्कर संयुक्तिकरीत्या कारवाई करत आहे. राजौरी येथे हे दहशवादी एका गुहेत लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू केली; परंतु गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनीही हल्ला केला. काल, पुन्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे कालही पाच जवान शहीद झाले, तर स्पेशल फोर्समधील एक अधिकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या