जम्मूमध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली असून जम्मूमध्ये रोज चकमकी घडत आहेत. शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते, तर शनिवारी सकाळी जम्मू पोलिसांनी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले आहे. २१ एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांना शोधण्याकरता जम्मू पोलीस आणि भारतीय लष्कर संयुक्तिकरीत्या कारवाई करत आहे. राजौरी येथे हे दहशवादी एका गुहेत लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू केली; परंतु गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनीही हल्ला केला. काल, पुन्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे कालही पाच जवान शहीद झाले, तर स्पेशल फोर्समधील एक अधिकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास