जम्मूमध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली असून जम्मूमध्ये रोज चकमकी घडत आहेत. शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते, तर शनिवारी सकाळी जम्मू पोलिसांनी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले आहे. २१ एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांना शोधण्याकरता जम्मू पोलीस आणि भारतीय लष्कर संयुक्तिकरीत्या कारवाई करत आहे. राजौरी येथे हे दहशवादी एका गुहेत लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू केली; परंतु गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनीही हल्ला केला. काल, पुन्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे कालही पाच जवान शहीद झाले, तर स्पेशल फोर्समधील एक अधिकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व