प्रकल्पाला विरोध करायचा असल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे रेटकार्ड तयार

आमदार नितेश राणे यांचा आरोप


मुंबई (प्रतिनिधी) : जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात प्रकल्प येतात, तेव्हा त्याला विरोध करायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे एक रेट कार्ड तयार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.


ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पाहिजे असतील, तर इतके कोटी दिले पाहिजे, उद्धव किंवा आदित्य पाहिजे असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य पाहिजे असल्यास आणखी काही कोटी द्यावे लागतील. उद्धव यांच्या बरोबर १० हजार सैनिक पाहिजे असल्यास इतके कोटी द्यावे लागतील, असे हे रेटकार्ड त्यांच्याकडे तयार आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात असे प्रकल्प येतात, तेव्हा त्यांची माणसे समोरच्या लोकांशी ज्यांना विरोध करायचा अशा लोकांशी उद्धव ठाकरे यांची माणसे संपर्क साधून असा प्रकल्प रोखायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे रेटकार्ड तयार आहे.


जे लोक उद्धव ठाकरे यांच्याशी कमिटमेंट करतील, त्यांच्यासाठी ते तेथे जाऊन भाषण करतील आणि प्रकल्प बंद पाडतील व तुम्हाला फायदा मिळवून देतील, असेही त्यांची माणसे सांगतात. देशविरोधी ताकदींना सपोर्ट करण्याचे काम ठाकरे व त्यांची वसुली गँग करीत आहे, असा आरोपही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला.


दरम्यान महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात केरळ स्टोरी घडत असून हिंदू भगिनींना लव्ह जिहादच्या नावावर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


ते पुढे म्हणाले, केरळ हे केवळ एक उदाहरण आहे. केरळमध्ये ३२ हजार मुली गायब झाल्या आहेत. महाराष्ट्राचेही उदाहरण दिल्यास केरळप्रमाणेच येथेही घडत आहे. लव्ह जिहादच्या नावावर मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. देशात हिंदूंविरोधी मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जे जिहादी लोक आहेत, त्यांना हिंदुस्तानला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, त्यासाठी हे सर्व प्रयत्न चाललेले आहेत, असेही आ. नितेश राणे यावेळी म्हणाले. केरळ स्टोरी थिएटरमध्ये जाऊन पाहा, अशी विनंतीही त्यांनी देशवासीयांना केली. सत्यता काय आहे, ते पाहा. हा काही राजकीय मुद्दा नाही, असे सांगून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

हरित क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल : २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : (२५ मार्च) राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन

मिठीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पावले

तीन कामासाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५