गुजरातकडून राजस्थानचा धुव्वा

जयपूर (वृत्तसंस्था) : राशिद खानसह गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर ९ विकेट राखून सोपा विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.



राजस्थानने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य गुजरातने सहज पार केले. शुभमन गिलने ३६ धावांची भर घातली. ही एकमेव विकेट चहलने मिळवली. गिलने ३६ धावांच्या खेळीत ६ चौकार लगावले. गिल बाद झाल्यानंतर राजस्थानला गुजरातची एकही विकेट मिळवता आली नाही. वृद्धीमान साहा आणि हार्दिक पंड्या यांनी नाबाद खेळी खेळून गुजरातला १३.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. साहाने नाबाद ४१ धावा जोडल्या. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले. पंड्याने १५ चेंडूंत नाबाद ३९ धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार फटकवले. गुजरातने १३.५ षटकांत विजयी लक्ष्य पार केले.



राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव १७.५ षटकांत ११८ धावांत संपुष्टात आला.



गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर जयपूरच्या फलंदाजांवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी पाच विकेट घेतल्या. १७.५ षटकांत राजस्थानचा संघ ११८ धावांवर सर्वबाद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. आक्रमक जोस बटलर अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. तर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला.



यशस्वीने ११ चेंडूंत १४ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने २० चेंडूंत ३० धावा जोडल्या. लागोपाठ विकेट पडल्यामुळे राजस्थानचा डाव अडचणीत सापडला होता. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने शिमरोन हेटमायरला सात धावांवर बाद केले, तर ध्रुव जुरेलला ९ धावांवर नूर अहमदने तंबूत पाठवले.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत