घोटाळेबाज अजित पवारांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष करु नये!

  194

सांगली: अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अजित पवारांना पुढील अध्यक्ष करु नये, असं खळबळजनक विधान आमदार शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याने ईडी चौकशीपासून अजित पवार बचावले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.


आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाते, मात्र अजित पवारांना १४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी का बोलवत नाही? असा सवाल शालीनीताई पाटील यांनी उपस्थित केला आहे.


पुढे बोलताना, सुप्रिया सुळे यांना पुढचा अध्यक्ष म्हणून नेमावं, कारण त्या या पदासाठी सक्षम आहेत, असंही शालीनीताई यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घाईत घेतला. त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारुन हा निर्णय घ्यायला हवा होता. पवार यांनी जरी निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला असेल तरीही समितीचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हा निर्णय ग्राह्य मानला जाणार नाही. मी ९० वर्षांची असून शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही माझं कामकाज व्यवस्थितरित्या सांभाळते, त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलं.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या