मुंबईने घेतला पंजाबचा बदला

सूर्यकुमार-ईशानने लावला विजयाचा 'तिलक'


मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा ४६ वा सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियममध्ये खूपच रंगतदार असा झाला. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांनी आतापर्यंत ३० सामने खेळताना १५-१५ सामने जिंकले आहेत. मोहाली स्टेडियमवर दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत.


मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच धुतल्यामुळे मुंबई इंडिन्सला विजयासह आपल्या पराभवाचा बदला घेता आला. यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केले होते. पण मुंबईने बुधवारच्या या सामन्यात दमदार विजय साकारला. पंजाबने मुंबईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईला विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ३१ चेंडूंत ६६ धावांची तुफान खेळी साकारली. तर इशानने ४१ चेंडूंत ७५ धावा ठोकल्या.


पंजाबच्या २१५ धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्माच्या रुपात पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यांनतर काही काळ कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांची जोडी जमली होती. पण ग्रीन यावेळी २३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर इशान आणि सूर्या यांची चांगली जोडी जमली. इशान किशनने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने तर २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपले इरादे स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय पंजाबच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच सामचार घेतला आणि २०० धावांचा टप्पा पुन्हा एकदा गाठला. पंजाबची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. अर्शद खानने दुसऱ्याच षटकात पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. पण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन एक मोठा फटका मारायला गेला होता. पण त्यावेळी धवनचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्याठी जोफ्रा आर्चर उभा होता. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. पण जोफ्राला यावेळी चेंडूचा अंदाज घेतला आला नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातावर बसला आणि उडाला. त्यामुळे धवनला यावेळी जीवदान मिळाले होते. पण धवनला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही.


 

विस्फोटक लिव्हिंगस्टोन...
लियाम लिव्हिंगस्टोन याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ८२ धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने जितेश शर्माच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. लिव्हिंगस्टोन याने जोफ्रा आर्चर आर्चरला लागोपाठ तीन षटकार मारत धावसंख्या वाढवली. लिव्हिंगस्टोन याला जितेश शर्मा याने चांगली साथ दिली. जितेश शर्मा याने २७ चेंडूत नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. एका धावेवर जितेश शर्माचे अर्धशतक होऊ शकले नाही.

Comments
Add Comment

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात

Vaibhav Suryawanshi : '७ षटकार, ७ चौकार'! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे मोडले कंबरडे, केली नाबाद १०८ धावांची वादळी खेळी!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना