मुंबईने घेतला पंजाबचा बदला

सूर्यकुमार-ईशानने लावला विजयाचा 'तिलक'


मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा ४६ वा सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियममध्ये खूपच रंगतदार असा झाला. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांनी आतापर्यंत ३० सामने खेळताना १५-१५ सामने जिंकले आहेत. मोहाली स्टेडियमवर दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत.


मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच धुतल्यामुळे मुंबई इंडिन्सला विजयासह आपल्या पराभवाचा बदला घेता आला. यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केले होते. पण मुंबईने बुधवारच्या या सामन्यात दमदार विजय साकारला. पंजाबने मुंबईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईला विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ३१ चेंडूंत ६६ धावांची तुफान खेळी साकारली. तर इशानने ४१ चेंडूंत ७५ धावा ठोकल्या.


पंजाबच्या २१५ धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्माच्या रुपात पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यांनतर काही काळ कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांची जोडी जमली होती. पण ग्रीन यावेळी २३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर इशान आणि सूर्या यांची चांगली जोडी जमली. इशान किशनने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने तर २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपले इरादे स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय पंजाबच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच सामचार घेतला आणि २०० धावांचा टप्पा पुन्हा एकदा गाठला. पंजाबची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. अर्शद खानने दुसऱ्याच षटकात पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. पण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन एक मोठा फटका मारायला गेला होता. पण त्यावेळी धवनचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्याठी जोफ्रा आर्चर उभा होता. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. पण जोफ्राला यावेळी चेंडूचा अंदाज घेतला आला नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातावर बसला आणि उडाला. त्यामुळे धवनला यावेळी जीवदान मिळाले होते. पण धवनला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही.


 

विस्फोटक लिव्हिंगस्टोन...
लियाम लिव्हिंगस्टोन याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ८२ धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने जितेश शर्माच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. लिव्हिंगस्टोन याने जोफ्रा आर्चर आर्चरला लागोपाठ तीन षटकार मारत धावसंख्या वाढवली. लिव्हिंगस्टोन याला जितेश शर्मा याने चांगली साथ दिली. जितेश शर्मा याने २७ चेंडूत नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. एका धावेवर जितेश शर्माचे अर्धशतक होऊ शकले नाही.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या

इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय

नवी दिल्ली  : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून

अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान

ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजय नवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला

टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान

वर्ल्डकपमध्ये जागा टिकविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथला निमंत्रण

मुंबई  : दुखापतींचे ग्रहण, खराब फॉर्म आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव यामुळे ऑस्ट्रेलियावर

भारत सुपर एटमध्ये कोणाविरुद्ध खेळणार ?

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना ६१ धावांनी जिंकलेला भारत अ गटातून