मुंबईने घेतला पंजाबचा बदला

  145

सूर्यकुमार-ईशानने लावला विजयाचा 'तिलक'


मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा ४६ वा सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियममध्ये खूपच रंगतदार असा झाला. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांनी आतापर्यंत ३० सामने खेळताना १५-१५ सामने जिंकले आहेत. मोहाली स्टेडियमवर दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत.


मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच धुतल्यामुळे मुंबई इंडिन्सला विजयासह आपल्या पराभवाचा बदला घेता आला. यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केले होते. पण मुंबईने बुधवारच्या या सामन्यात दमदार विजय साकारला. पंजाबने मुंबईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईला विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ३१ चेंडूंत ६६ धावांची तुफान खेळी साकारली. तर इशानने ४१ चेंडूंत ७५ धावा ठोकल्या.


पंजाबच्या २१५ धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्माच्या रुपात पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यांनतर काही काळ कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांची जोडी जमली होती. पण ग्रीन यावेळी २३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर इशान आणि सूर्या यांची चांगली जोडी जमली. इशान किशनने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने तर २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपले इरादे स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय पंजाबच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच सामचार घेतला आणि २०० धावांचा टप्पा पुन्हा एकदा गाठला. पंजाबची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. अर्शद खानने दुसऱ्याच षटकात पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. पण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन एक मोठा फटका मारायला गेला होता. पण त्यावेळी धवनचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्याठी जोफ्रा आर्चर उभा होता. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. पण जोफ्राला यावेळी चेंडूचा अंदाज घेतला आला नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातावर बसला आणि उडाला. त्यामुळे धवनला यावेळी जीवदान मिळाले होते. पण धवनला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही.


 

विस्फोटक लिव्हिंगस्टोन...
लियाम लिव्हिंगस्टोन याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ८२ धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने जितेश शर्माच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. लिव्हिंगस्टोन याने जोफ्रा आर्चर आर्चरला लागोपाठ तीन षटकार मारत धावसंख्या वाढवली. लिव्हिंगस्टोन याला जितेश शर्मा याने चांगली साथ दिली. जितेश शर्मा याने २७ चेंडूत नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. एका धावेवर जितेश शर्माचे अर्धशतक होऊ शकले नाही.

Comments
Add Comment

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.

आशिया कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची आज (१९ ऑगस्ट, २०२५) घोषणा होणार आहे. यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक

आशिया कपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची निवड लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत निवड समिती काही

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

लिओनेल मेस्सीचा भारत दौरा ठरला, 'या' तारखेला येणार मुंबईत!

नवी दिल्ली: अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Manu Bhaker: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून दिली मानवंदना

नवी दिल्ली: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा