पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारताचे लक्ष्य - जितेंद्र सिंह

लंडन : पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे हे भारत सरकारच्या मुख्य अजेंड्यापैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. जितेंद्र सिंह सध्या इग्लंडच्या यात्रेवर आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक गट आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.


याप्रसंगी जितेंद्र सिंह म्हणाले की, जर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना उर्वरित भारता प्रमाणे जम्मू-काश्मीर हाताळण्याची मुभा मिळाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पीओकेचा मुद्दा कधीच पुढे आला नसता. पीओके पाकिस्तानच्या नियंत्रणातून परत आणणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी ‘भारतविरोधी वक्तव्य’ बदलल्याबद्दल येथे उपस्थित लोकांचे आभार मानले आहेत.


जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चर्चेदरम्यान जुन्या सरकारने केलेल्या अनेक विसंगतींवर जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील कलम ३७० लागू झाल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन मुलींना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेचे घटनात्मक अधिकार दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे नेहमीच स्मरण केले जाईल. तसेच पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनाही त्यांचे हक्क मिळणार आहेत. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, सामाजिक गटांनी अधोरेखित केले आहे की ते भारतासोबत असलेल्या लोकांना एकत्र करत आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात ही संघटना स्थापन केली जात आहे.

Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त