कोकणच्या विकासाआड येणाऱ्याला विरोध करणारच : नारायण राणे

  165

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणच्या विकासाआड कोण येईल त्याला मी विरोध करणार. मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असले तरी. त्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढला तर मी रिफायनरी समर्थनात त्याच ठिकाणी मोर्चा काढणार, असा स्पष्ट इशारा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. कणकवली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० व्या "मन की बात" कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.



पुढे बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, एअरपोर्टला विरोध, सी वर्ल्डला विरोध, कोणताही प्रकल्प आला त्याला विरोध, मग कसा कोकणचा विकास होईल? काही वर्षांपूर्वी बोलत होते की, आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया बनवू. मात्रा कोकणात काय करायचे झाले की यांचा विरोध उभा राहतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री राणे यांनी संताप व्यक्त केला. विरोधकांनी माहिती घ्यावी कॅलिफोर्नियामध्ये असे चौदा प्रकल्प आहेत. कोकणी तरुणांना नोकऱ्या पाहिजेत, रोजगार पाहिजेत, आर्थिक प्रगती व्हायची असेल, तर उद्योगाशिवाय काहीच शक्य नाही. एक-दीड लाख करोड खर्च करून जो प्रकल्प येणार, तो प्रकल्प हजारो शिकलेल्या मुला-मुलींना नोकऱ्या मिळवून देणारा आहे. आजच्या स्थितीत हजारो मुलं बेकार आहेत. डीएड झालेले अनेक जण नऊ-दहा वर्षे बेकार आहेत. हा प्रश्न का नाही सोडवला? असा सवाल त्यांनी केला.



शिकलेले पदवीधर आज बेकार आहेत. मग हे कशाला विरोध करतात. त्यांना नोकऱ्या कुठून देणार? कोण उद्धव ठाकरे? त्याला घेऊन या, मी ही बघतो. विरोध करायला इथे. जर कोणीही यापुढे कोकणातील प्रकल्पांना विरोध करेल. त्याला मी सामोरे जाईन, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.