उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्याचा खर्च करतो कोण?

मातोश्रीसह ठाकरेंचा सर्व खर्च मुंबईचे गुजराती उद्योजक आणि बिल्डर करत असल्याचा भाजप आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांची भाजपने निवड केली. नितेश राणे राऊत यांच्यानंतर रोज प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेतात. आज त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, मातोश्री कोण चालवत आहे. गुजराती समाजाचा तुम्हाला पैसा चालतो. उद्धव ठाकरे बाहेर फिरतात, हे पैसे कुणाचे असतात. उद्धव ठाकरेंच्या खिशातून एक रूपयापण जात नाही. सर्व खर्च मुंबईचे उद्योजक आणि बिल्डर करतात. यावेळी त्यांना गुजरात्यांचा पैसा चालतो, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे म्हणाले, ठाकरेंना गुजरात्यांचा पैसा चालतो. मात्र गुजरात्यांवर टीका करत आहेत. शाहांच्या नावाची अॅलर्जी आहे. पण उद्धव ठाकरे जे बाहेर फिरतात. त्यांचा खर्च कोण करते? गुजराती बंधू मातोश्री चालवतात. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका करतात.


यावेळी त्यांनी संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे जावई म्हणून फिरायचे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. मविआ संविधान मानत नाही. ते शरीया कायदा पाळणारे लोक आहेत. तोच कायदा हे लोक पाळतात. संविधान पाळत असते तर आमच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या देवतांवर अन्याय झाले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी संजय पांडे हा उद्धव ठाकरेंचा जावई म्हणून फिरायचा. तो संजय पांडे रझाकारांबरोबर इफ्तार पार्टी करत असतो.


दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटे पेंग्वीन असा उल्लेख केला. काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा चौकात गेले होते. हुतात्मा चौकाचे शुद्धीकरण करण्याची मागणी देखील राणे यांनी केली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र