छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय


नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वादविवाद सुरु असताना तिकडे छत्तीसगडमध्ये आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यातील ५८ टक्के आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवली आहे. यासोबतच या आरक्षणाच्या आधारे भरती आणि पदोन्नती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राज्य सरकारने आनंद व्यक्त केला आहे.


आता राज्यातील सरकारी नोकऱ्यांमधील भरती, पदोन्नती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी बिलासपूर उच्च न्यायालयाने ५८ टक्के आरक्षण घटनाबाह्य ठरवत फेटाळले होते.


छत्तीसगड सरकारने २०१२ मध्ये ५८ टक्के आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली होती. यामध्ये राज्याच्या लोकसंख्येनुसार शासनाने आरक्षणाचे रोस्टर जाहीर केले होते. याअंतर्गत अनुसूचित जमातीसाठी २० ऐवजी ३२ टक्के, अनुसूचित जातींसाठी १६ ऐवजी १२ टक्के आणि ओबीसींसाठी १४ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे आरक्षणाची व्याप्ती संविधानाने ठरवून दिलेल्या ५० टक्क्यांहून अधिक झाली आहे.


बिलासपूर उच्च न्यायालयाने ५८ टक्के आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील आरक्षण पूर्णपणे रद्द करण्यात आले. सर्व पदांवरील भरती आणि पदोन्नती स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएससीसह अनेक भरतींचे अंतिम निकाल रोखण्यात आले. आरक्षणाअभावी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.


दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, ते म्हणाले की ५८ टक्के आरक्षणावरील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो, परंतु नवीन विधेयकावर राज्यपालांनी सही केली तरच योग्य न्याय मिळेल. छत्तीसगडमधील तरुणांविरुद्ध भाजपच्या षडयंत्राविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. लढू आणि जिंकू देखील.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी