नितेश राणे यांच्या प्रश्नांवर उबाठा सेनेने उत्तर द्यावे : बावनकुळे

कणकवली (वार्ताहर) : आमदार नितेश राणे हे मुख्य प्रवक्ते म्हणून अभ्यासपूर्ण आणि अचूक बोलतात. आमदार नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असेल, तर त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधीही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती खरीच असते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल, ती माहिती खरी असेल. त्याचे उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी