नितेश राणे यांच्या प्रश्नांवर उबाठा सेनेने उत्तर द्यावे : बावनकुळे

कणकवली (वार्ताहर) : आमदार नितेश राणे हे मुख्य प्रवक्ते म्हणून अभ्यासपूर्ण आणि अचूक बोलतात. आमदार नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असेल, तर त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधीही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती खरीच असते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल, ती माहिती खरी असेल. त्याचे उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२