नितेश राणे यांच्या प्रश्नांवर उबाठा सेनेने उत्तर द्यावे : बावनकुळे

कणकवली (वार्ताहर) : आमदार नितेश राणे हे मुख्य प्रवक्ते म्हणून अभ्यासपूर्ण आणि अचूक बोलतात. आमदार नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असेल, तर त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधीही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती खरीच असते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल, ती माहिती खरी असेल. त्याचे उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती