नितेश राणे यांच्या प्रश्नांवर उबाठा सेनेने उत्तर द्यावे : बावनकुळे

कणकवली (वार्ताहर) : आमदार नितेश राणे हे मुख्य प्रवक्ते म्हणून अभ्यासपूर्ण आणि अचूक बोलतात. आमदार नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असेल, तर त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधीही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती खरीच असते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल, ती माहिती खरी असेल. त्याचे उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती