माथेरानमध्ये भरलाय निसर्गाचा रंगोत्सव…

माथेरान : वसंत पंचमी पासूनच वसंत ऋतूला सुरुवात झाली. तेव्हापासून निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असताना दिसतो. कुठे पळस फुलतो, काटेसावर बहरतो, रानमोगऱ्याची फुले निसर्गाच्या शृंगारात भर टाकतात आणि सुरू होतो जणू काही जवळपास महिनाभर किंवा त्याहीपेक्षा थोडा अधिक काळ रंगणारा निसर्गाचा रंगोत्सव…


रायगड जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभल्रेले, निसर्गवैभवाची मुक्तहस्ताने उधळण झालेले, जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या डोंगर आणि शिवारामध्ये असेच काटेसावर, रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात नजरेस पडते, तर त्याचबरोबर अनेक वृक्षही पर्ण-फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात. निसर्गात अनेक ठिकाणी आपण फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. सध्या असेच काहीसे दृश्य माथेरान आणि त्याच्या अवतीभवतीच्या निसर्गात गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडते आहे. वृक्षांनी आपले रूपडे पूर्णतः पालटलेले दिसते आहे. हिरव्या गच्च असणाऱ्या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक नजरेस पडतात. आज पानझड, उद्या गुलाबी कोवळी पाने, परवा गडद लाल पाने, तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा ठरतो.


आपल्याला रस्त्याच्या कडेला, बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा दिसतो, कुठे जांभळ्या रंगाच्या कागदी फुलांचा ताम्हण लक्ष वेधतो, तर कुठे पांगारा, काटेसावर, विविधरंगी बोगनवेल अशी नानाविध प्रकारची फुलझाडे बहरतात व अवचित आपले लक्ष वेधून घेतात. पण माथेरानच्या डोंगर कुशीत, त्यांच्या अंगाखांद्यावर फुलांबरोबरच अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो, अशी माहिती माथेरानच्या सरस्वती विद्यामंदिर येथील मराठी भाषेचे अध्यापक संघपाल वाठोरे यांनी दिली आहे.


निसर्गाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. माणसांना जीर्ण झाल्यानंतर हळूहळू त्याचा प्रवास मृत्यूकडे होतो. मृत्यूनंतर त्यांना विधीपूर्वक निरोप दिला जातो. तसेच काहीसे निसर्गाचे कृत्य वाटते. जीर्ण झालेल्या पानांना कुठलीही इजा न होता हळुवारपणे आपल्यातून निरोप द्यायचा आणि आणि नव्याचे स्वागत करायचे तेही अगदी गळणाऱ्या पानाला दुःख न होता...

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने