माथेरानमध्ये भरलाय निसर्गाचा रंगोत्सव…

माथेरान : वसंत पंचमी पासूनच वसंत ऋतूला सुरुवात झाली. तेव्हापासून निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असताना दिसतो. कुठे पळस फुलतो, काटेसावर बहरतो, रानमोगऱ्याची फुले निसर्गाच्या शृंगारात भर टाकतात आणि सुरू होतो जणू काही जवळपास महिनाभर किंवा त्याहीपेक्षा थोडा अधिक काळ रंगणारा निसर्गाचा रंगोत्सव…


रायगड जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभल्रेले, निसर्गवैभवाची मुक्तहस्ताने उधळण झालेले, जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या डोंगर आणि शिवारामध्ये असेच काटेसावर, रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात नजरेस पडते, तर त्याचबरोबर अनेक वृक्षही पर्ण-फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात. निसर्गात अनेक ठिकाणी आपण फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. सध्या असेच काहीसे दृश्य माथेरान आणि त्याच्या अवतीभवतीच्या निसर्गात गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडते आहे. वृक्षांनी आपले रूपडे पूर्णतः पालटलेले दिसते आहे. हिरव्या गच्च असणाऱ्या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक नजरेस पडतात. आज पानझड, उद्या गुलाबी कोवळी पाने, परवा गडद लाल पाने, तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा ठरतो.


आपल्याला रस्त्याच्या कडेला, बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा दिसतो, कुठे जांभळ्या रंगाच्या कागदी फुलांचा ताम्हण लक्ष वेधतो, तर कुठे पांगारा, काटेसावर, विविधरंगी बोगनवेल अशी नानाविध प्रकारची फुलझाडे बहरतात व अवचित आपले लक्ष वेधून घेतात. पण माथेरानच्या डोंगर कुशीत, त्यांच्या अंगाखांद्यावर फुलांबरोबरच अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो, अशी माहिती माथेरानच्या सरस्वती विद्यामंदिर येथील मराठी भाषेचे अध्यापक संघपाल वाठोरे यांनी दिली आहे.


निसर्गाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. माणसांना जीर्ण झाल्यानंतर हळूहळू त्याचा प्रवास मृत्यूकडे होतो. मृत्यूनंतर त्यांना विधीपूर्वक निरोप दिला जातो. तसेच काहीसे निसर्गाचे कृत्य वाटते. जीर्ण झालेल्या पानांना कुठलीही इजा न होता हळुवारपणे आपल्यातून निरोप द्यायचा आणि आणि नव्याचे स्वागत करायचे तेही अगदी गळणाऱ्या पानाला दुःख न होता...

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग