जलवाहिनीतील गळती शोधासाठी अत्याधुनिक ‘क्राऊलर कॅमेरा’

  143

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये अनेकदा निर्माण झालेली पाण्याची गळती किंवा दूषित पाण्याचा शिरकाव शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. हे काम वेळच्या वेळी व तातडीने व्हावे, यासाठी महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचा कॅमेरा महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडे होता, पण तो नादुरुस्त झाल्याने आता अत्याधुनिक पद्धतीचा क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येणार असून या खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.



जलवाहिन्यांमधील दुरुस्तीच्या कामातील वेळेची बचत होण्याच्या अनुषंगाने क्राऊलर कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. क्राऊलर कॅमेऱ्याच्या वापरामुळे नागरिकांचा पाणी पुरवठा किमान वेळेत सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामात जलअभियंता विभागाचा वेळ वाचण्यासाठीही मदत होणार आहे.



अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मुंबईतील जलवाहिन्यांचे जाळे हे भूमिगत असून अतिशय क्लिष्ट अशा जलवाहिनीच्या वितरण जाळ्यामुळे पाण्याची गळती अथवा दूषित पाणीपुरवठ्याचे ठिकाण शोधणे हे आव्हान ठरत असते. त्यामुळे सीसीटीव्हीसारख्या पद्धती असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा क्राऊलर कॅमेरा वापरात येईल. क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हीडिओ मिळवणे, व्हीडिओ रेकॉर्ड करणे शक्य होते. कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.