मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भारत देश हा २०३० पर्यंत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होण्याचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी आपला प्रत्येकाचा हातभार असला पाहिजे असे सांगत प्रत्येक नवउद्यमींच्या मागे सिडबी, सूक्ष्म व लघू उद्योग खाते व सीजीटीएमएसई या संस्था उभ्या आहेत. त्याचा उपयोग घेऊन व अथक परिश्रम करून आपण हे नक्कीच करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज वांद्रे येथे सूक्ष्म व लघू उद्योग क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या म्हणजेच सीजीटीएमएसईद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीजीटीएमएसइच्या सुधारित योजनेचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सूक्ष्म व लघू खात्याचे सेक्रेटरी बी. बी. स्वेन, सिडबीचे चेयरमन एस रामम व सूक्ष्म व लघू खात्याचे आयुक्त इशिता त्रिपाठी उपस्थित होत्या. यावेळी नारायण राणे म्हणाले की, बँकांनी नवउद्यमींना फक्त पैसाच पुरवू नये तर त्यासाठी अजून काय काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. नवउद्यमींनी कर्ज घेतल्यानंतर त्या उद्योजकांनी पुढे कोणती प्रगती केली. त्यांनी कोणते उत्पादन घेतले, त्यांची वार्षिक उलाढाल किती आहे हेही बघितले पाहिजे तसेच त्यांनी किती रोजगार निर्माण केला व देशाच्या प्रगतीसाठी किती हातभार लावला हे पाहून त्यांचाही सत्कार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…