नैसर्गिक आपत्तीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका

  226

छत्रपती संभाजीनगर : सलग तिसर्‍या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे नुकसान, विजेच्या तारा पडून जीवितहानी झाली आहे.


अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्घटना घडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मालटेकडी परिसरातील कामठा येथे वीज पडून शेख वजीर शेख चांद या ४५ वर्षीय तर जवाहरनगर तुप्पा येथे हिमाचलचे रहिवासी तारासिंग बाबूराम या ४० वर्षीय व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने व्यंकटी लक्ष्मण दंडलवार या युवकाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. टीनपत्रावरील दगड अंगावर पडल्याने सोनुबाई नंदू पवार या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडून गणेश जहाने या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.


सांगोला येथे वावटळीमुळे लाकडी काठ्यांना बांधलेला कापडी पाळणा उडाला व त्यात ठेवलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. जळगावात वावटळीमुळे उभा कंटेनर कलंडून अभियंत्यासह दोन मजूर ठार झाले. गुरुवारी कंटेनरमधून लोखंडी पत्रे काढत असताना वावटळ सुरु झाली. त्यात पत्री शेड, पाच ते सहा दुचाकीही उडून गेल्या. याच वेळी भोला व चंद्रकांत हे दोन मजूर कंटेनरच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. वावटळीत हा कंटेनर कलंडून दोघांच्या अंगावर कोसळून दोघेही जागीच गतप्राण झाले.


अशा दुर्घटना घडत असतानाच हवामान खात्याने पुढील आणखी काही दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक