नैसर्गिक आपत्तीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका

छत्रपती संभाजीनगर : सलग तिसर्‍या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे नुकसान, विजेच्या तारा पडून जीवितहानी झाली आहे.


अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्घटना घडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मालटेकडी परिसरातील कामठा येथे वीज पडून शेख वजीर शेख चांद या ४५ वर्षीय तर जवाहरनगर तुप्पा येथे हिमाचलचे रहिवासी तारासिंग बाबूराम या ४० वर्षीय व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने व्यंकटी लक्ष्मण दंडलवार या युवकाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. टीनपत्रावरील दगड अंगावर पडल्याने सोनुबाई नंदू पवार या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडून गणेश जहाने या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.


सांगोला येथे वावटळीमुळे लाकडी काठ्यांना बांधलेला कापडी पाळणा उडाला व त्यात ठेवलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. जळगावात वावटळीमुळे उभा कंटेनर कलंडून अभियंत्यासह दोन मजूर ठार झाले. गुरुवारी कंटेनरमधून लोखंडी पत्रे काढत असताना वावटळ सुरु झाली. त्यात पत्री शेड, पाच ते सहा दुचाकीही उडून गेल्या. याच वेळी भोला व चंद्रकांत हे दोन मजूर कंटेनरच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. वावटळीत हा कंटेनर कलंडून दोघांच्या अंगावर कोसळून दोघेही जागीच गतप्राण झाले.


अशा दुर्घटना घडत असतानाच हवामान खात्याने पुढील आणखी काही दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली