सोनिया गांधींचा 'विषकन्या' असा उल्लेख करत भाजपचे काॅंग्रेसला उत्तर

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काॅंग्रेस यांच्यामध्ये पलटवार होत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे भाजप आमदार बासनगौडा यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटलं आहे.


“संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारलं आहे. एकेकाळी व्हिसा देण्यास नकार दिलेल्या अमेरिकेने नंतर रेड कार्पेट अंथरून मोदींचं स्वागत केलं. आता खरगे त्यांची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत आणि तो विष टाकेल असा दावा करीत आहेत. पण खरगे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी विषकन्या आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केलं आहे,” असं विधान आमदार बासनगौडा यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, खरगेंच्या पक्षातील नेते नेहमीच पंतप्रधान मोदींची चहावाला, दुर्योधन, गटारातील किडा, मौत का सौदागर अशा शब्दांत हेटाळणी करतात. लोकशाहीत अशा शब्दांचा कधीच वापर करु नये.

Comments
Add Comment

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७