सोनिया गांधींचा 'विषकन्या' असा उल्लेख करत भाजपचे काॅंग्रेसला उत्तर

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काॅंग्रेस यांच्यामध्ये पलटवार होत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे भाजप आमदार बासनगौडा यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटलं आहे.


“संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारलं आहे. एकेकाळी व्हिसा देण्यास नकार दिलेल्या अमेरिकेने नंतर रेड कार्पेट अंथरून मोदींचं स्वागत केलं. आता खरगे त्यांची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत आणि तो विष टाकेल असा दावा करीत आहेत. पण खरगे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी विषकन्या आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केलं आहे,” असं विधान आमदार बासनगौडा यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, खरगेंच्या पक्षातील नेते नेहमीच पंतप्रधान मोदींची चहावाला, दुर्योधन, गटारातील किडा, मौत का सौदागर अशा शब्दांत हेटाळणी करतात. लोकशाहीत अशा शब्दांचा कधीच वापर करु नये.

Comments
Add Comment

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची