सर्व शंकांचे निरसन करूनच ‘बारसू’ प्रकल्प पुढे नेणार

राजापूर (प्रतिनिधी): ‘एकमेकांशी होणाऱ्या संवादातून चांगली चर्चा होते व प्रश्न सुटू शकतात. तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी गुरुवारच्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून यातून मार्ग काढावा हाच आपला प्रयत्न आहे. शेती, पर्यावरणाला हानी पोहचेल, प्रदूषण होईल याचे आम्हीही कधी समर्थन करणार नाही. मात्र हा प्रकल्प आपल्या देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपल्या शंकांचे निरसन करून, उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करूनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल’, अशी ग्वाही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिली.


या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा जीडीपी १.८ टक्क्यांनी, तर देशाचा जीडीपी पाच ते दहा टक्यांनी वाढणार आहे. विकासाची नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने या प्रकल्पाबाबत चांगली चर्चा करून, आपल्या शंकाचे निरसन करून घेऊन सकारात्मक भूमिका घेताना देशहित डोळ्यांसमोर ठेऊन या प्रकल्पाकडे पाहूया, असे आवाहन करताना रोजगार, शिक्षण, आरोग्य याबरोबरच ज्यांची जमीन या प्रकल्पात जात नाही. मात्र ते प्रकल्पग्रस्त आहेत, त्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभ कसा होईल यासाठीही आपण प्रयत्न करू, तसा अहवाल शानसाला देऊ, असा विश्वासही सिंग यांनी यावेळी उपस्थित स्थानिक भूमिपुत्रांना दिला.


तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रकल्प विरोधक आणि प्रकल्प समर्थक यांची एक बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी गुरुवारी आयोजित केली होती.

Comments
Add Comment

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका

Anjanari Ghat Accident : आंजनारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाची थरारक सुटका

रत्नागिरी : रत्नागिरीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) वरील आंजनारी घाटात (Anjanari Ghat) शुक्रवारी (३ जुलै)

Khed News : खेडमधील धक्कादायक घटना! धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून चिमुकल्यासह तिघांनी मारली उडी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मडगावहून मुंबईतील छत्रपती शिवाजी

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह