देवदर्शनाला जायचंय? ऑनलाईन बुकिंग करताय तर सावधान!

मोबाईलवर येणारा ओटीपी कोणालाही द्याल तर फसाल!


अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासमध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने १४ जणांना फसवले


मुंबई : अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने फसविणाऱ्या दोन सायबर चोरांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या तिघांनी एका महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती.


पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांच्याकडे अशा प्रकारच्या तब्बल १४ तक्रारी आल्याचे उघडकीस आले आहे. या फसवणुकीतही या तिघांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील एका महिलेला तिच्या वृद्ध आईवडिलांना अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी न्यायचे होते. अक्कलकोट येथील भक्तनिवासातील खोली राहण्यासाठी बुक करायची असल्याने तिने गुगलची मदत घेतली. गुगलवर अक्कलकोट संस्थांनचे नावे असलेली एक वेबसाइट तिला दिसली. तिने या वेबसाइटवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवरील व्यक्तीने सुशीलकुमार असे नाव सांगितले. महिलेला भक्तनिवासचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले. त्यानंतर खोली बुक करण्यासाठी २,२०० रुपये ‘जीपे’मार्फत पाठविण्यास सांगितले.


वारंवार प्रयत्न करूनही पैसे जात नसल्याने सुशीलकुमार याने या महिलेकडून ओटीपी मागून घेतला. त्यानंतर टप्याटप्याने तिच्या खात्यावरून तीन लाख नऊ हजार रुपये वळविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून शाहरुख शरीफ खान आणि सौरभ विशालसिंग गुर्जर या दोघांना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे उकळविण्याचे प्रकार होतात. यामध्ये ऑनलाइन भामट्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा