छगन भुजबळांनीही उडवली संजय राऊतांची खिल्ली

Share

मुख्यमंत्री बदलेल पण सरकार बदलणार नाही

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसात कोसळणार असे बेताल वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांना शकुनी मामा, वेडा झालेला प्राणी, कीडा अशा उपमा देत शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी डिवचले. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मुख्यमंत्री बदलेल पण सरकार बदलणार नाही, असे म्हणत संजय राऊतांची खिल्ली उडवल्याने राजकारण अधिकच तापले आहे.

“सुप्रीम कोर्टाचा निकाल आता तरी सरकार त्यांचेच राहील. कदाचित मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसात कोसळेल असे वक्तव्य राऊतांनी केले होते.

राज्यातील राजकारणावर अनेक दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी राजकीय गणितं अवलंबून आहेत. १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात आहेत. ते मुख्यमंत्री पदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

याच मुद्दयांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी या सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. १६ गेले तरी १४९ आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.

गेल्या काही दिवसापासून राज्यात अजित पवार राज्याचे मुखमंत्री होणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर देखील भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी एक तर मुख्यमंत्री पद खाली पाहिजे. नंतर संबंधित आमदारांचा सपोर्ट लागतो. ते अनेक वर्षात राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे सांगितले तर काही चूक नाही.”

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago