अरेरे! वणी कॉलेजच्या प्राध्यापकांचे निवृत्तीच्या एक दिवस आधी अपघाती निधन

दिंडोरी : तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप गाडी व मोटरसायकलच्या तिहेरी अपघातात प्राध्यापक रामदास माधव शिंदे रा. रवळस, ता. निफाड यांचा जागीच मृत्यू झाला.


प्राध्यापक रामदास शिंदे हे वणी येथील ज्युनियर कॉलेज मध्ये आपल्या एमएच १५ सीएम ४४७४ या अल्टो गाडीने जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणा-या सागर भास्कर पेलमहाले यांच्या एमएच १५ ईजी ५८३० क्रमांकाच्या पिकअप गाडीने अल्टो गाडीला जोरदार धडक धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून स्प्लेंडर प्रो- एमएच १५ डीएच ४९३१ ही विठ्ठल पंढरीनाथ पागे आंबेवणी यांची दुचाकी येऊन धडकली. या तिहेरी अपघातात प्राध्यापक रामदास शिंदे हे जागीच ठार झाले.


वलखेड फाटा येथे सोमवार दि. २४ रोजी सकाळी ८.३० वाजता ही दर्घटना घडली. वणी येथे मंगळवार दि. २५ रोजी त्यांचा निवृत्तीचा समारंभ होणार होता. त्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मोटरसायकलवरील विठ्ठल पागे हे अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे हे अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, वलखेड फाट्यावर टाकलेले फायबर स्पीड ब्रेकर निकृष्ट असल्यामुळे लवकर खराब होऊन उखडले गेले. याठिकाणी असलेली वर्दळ लक्षात घेऊन उच्च प्रतीचे स्पीड बेकर टाकण्यात यावेत. तसेच या स्पीड ब्रेकरची जागा काही अंतरावरून दिसतील अशा प्रकारे दिंडोरीच्या दिशेने पुढे घ्यावी, अशी मागणी वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत