पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणारा अटकेत

राजीव गांधींसारखी अवस्था करण्याची दिली होती धमकी


केरळ : पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. झेवियरने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.


कोचीचे पोलीस आयुक्त सेतू रमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांना धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्यासाठी झेवियरने हे पत्र लिहिले होते.


झेवियरने पत्रावर एनजे जॉनी म्हणून स्वाक्षरी केली आणि खाली फोन नंबर लिहिला होता. पोलिसांनी जॉनीची चौकशी केली असता, त्याला पत्राबाबत काहीही माहिती नाही, पण शेजारी झेवियरशी भांडण झाल्याचे त्याने मान्य केले. एर्नाकुलममधील कथरीकाडावू येथील रहिवासी असलेल्या झेवियरला पोलिसांनी त्याच्या हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतर अटक केली.


पंतप्रधान कोचीला पोहोचण्यापूर्वी येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासाठी २०६० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक दुपारी २ वाजल्यापासून वळवण्यात येणार आहे.


आयुक्त पुढे म्हणाले, "पंतप्रधानांच्या रोड शोसाठी १५,००० लोक आणि युवम-२३ कार्यक्रमासाठी २०,००० लोक अपेक्षित आहेत. युवम-२३ मध्ये येणारे सहभागी फक्त मोबाईल फोन आणू शकतात."


केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान २५ एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या ११ जिल्ह्यांना जोडेल. याशिवाय पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी करतील.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या