पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणारा अटकेत

राजीव गांधींसारखी अवस्था करण्याची दिली होती धमकी


केरळ : पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. झेवियरने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.


कोचीचे पोलीस आयुक्त सेतू रमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांना धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्यासाठी झेवियरने हे पत्र लिहिले होते.


झेवियरने पत्रावर एनजे जॉनी म्हणून स्वाक्षरी केली आणि खाली फोन नंबर लिहिला होता. पोलिसांनी जॉनीची चौकशी केली असता, त्याला पत्राबाबत काहीही माहिती नाही, पण शेजारी झेवियरशी भांडण झाल्याचे त्याने मान्य केले. एर्नाकुलममधील कथरीकाडावू येथील रहिवासी असलेल्या झेवियरला पोलिसांनी त्याच्या हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतर अटक केली.


पंतप्रधान कोचीला पोहोचण्यापूर्वी येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासाठी २०६० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक दुपारी २ वाजल्यापासून वळवण्यात येणार आहे.


आयुक्त पुढे म्हणाले, "पंतप्रधानांच्या रोड शोसाठी १५,००० लोक आणि युवम-२३ कार्यक्रमासाठी २०,००० लोक अपेक्षित आहेत. युवम-२३ मध्ये येणारे सहभागी फक्त मोबाईल फोन आणू शकतात."


केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान २५ एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या ११ जिल्ह्यांना जोडेल. याशिवाय पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी करतील.

Comments
Add Comment

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त