शिमला मिर्चीचा भाव १ रुपया, शेतकऱ्यांनी ट्रक भरुन माल रस्त्यावर फेकला

Share

मानसा: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सिमला मिरची पेरण्याचे आवाहन केल्याने मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले, खरे पण जास्त उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांवर शिमला मिरची रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना शिमला मिरची घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. पण तिथे शेतकऱ्यांच्या शिमला मिरचीला प्रति किलो १ रुपया किंमत मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अक्षरश: शिमला मिरचीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून शेतकऱ्यांनी शिमला मिरची रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली.

इथे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तर पंजाबमध्ये आवक जास्त असूनही शेतमालाला भाव मिळत नाहीय. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत.

दरम्यान, अधिक आवक पाहून व्यापाऱ्यांनी शिमला मिरची १ रुपये किलोने विकण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले. पंजाबमध्ये ३ लाख हेक्टरमध्ये हिरव्या भाज्यांची पेरणी केली जाते. शिमला मिरचीचे उत्पादन १५०० हेक्टरमध्ये होते. फिरोजपूर, संगरूर आणि मानसा जिल्ह्यात शिमला मिरचीची सर्वाधिक लागवड होते.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

1 hour ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago