शिमला मिर्चीचा भाव १ रुपया, शेतकऱ्यांनी ट्रक भरुन माल रस्त्यावर फेकला

मानसा: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सिमला मिरची पेरण्याचे आवाहन केल्याने मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले, खरे पण जास्त उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांवर शिमला मिरची रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना शिमला मिरची घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. पण तिथे शेतकऱ्यांच्या शिमला मिरचीला प्रति किलो १ रुपया किंमत मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अक्षरश: शिमला मिरचीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून शेतकऱ्यांनी शिमला मिरची रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली.


इथे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तर पंजाबमध्ये आवक जास्त असूनही शेतमालाला भाव मिळत नाहीय. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत.


दरम्यान, अधिक आवक पाहून व्यापाऱ्यांनी शिमला मिरची १ रुपये किलोने विकण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले. पंजाबमध्ये ३ लाख हेक्टरमध्ये हिरव्या भाज्यांची पेरणी केली जाते. शिमला मिरचीचे उत्पादन १५०० हेक्टरमध्ये होते. फिरोजपूर, संगरूर आणि मानसा जिल्ह्यात शिमला मिरचीची सर्वाधिक लागवड होते.

Comments
Add Comment

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत