दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या विजयाचा आनंद एकीकडे असताना संघाचे फ्रँचायजी डायरेक्टर सौरव गांगुली मात्र नाखुष होते. आम्हाला नशीबाने साथ दिली असे गांगुली म्हणाला.
सामना संपल्यानंतर गांगुली म्हणाला की, आज आम्हाला नशीबाने साथ दिली. आम्ही या हंगामाच्याआधीही चांगली गोलंदाजी केली होती. परंतु, समस्या फलंदाजीत आहे. आम्हाला स्वत:ला पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही चांगले प्रदर्शन कसे करू शकतो, हे पाहण्याची आम्हाला गरज आहे. फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही चांगले खेळलो नाही, याबाबत मला माहित आहे. आम्हाला चांगली फलंदाजी कशी करता येईल, यावर चांगला उपाय शोधण्याची गरज आहे.
गांगुली पुढे म्हणाला की, आम्ही खेळाडूंसोबत खूप मेहनत घेऊ आणि त्यांना फॉर्ममध्ये परत आणू. मग यात पृथ्वी शॉ असो, मनीष पांडे किंवा मिचेल मार्श असो. या खेळाडूंनी टीमसाठी याआधी खूप मोठे योगदान दिले आहे. आमच्याकडे एक दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर आम्ही हैद्राबादसाठी उड्डाण घेऊ. तिथे फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असेल, अशी आशा आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…